धाराशिव / प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून आकाशात ढगांची दाटी होत असून पावसाचे सावट कायम आहे. मात्र प्रत्यक्षात पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वातावरणात उकाडा वाढला असून ढगाळ हवामानामुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत.
खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या असल्या तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणीची कामे खोळंबली असून शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.
हवामान खात्याने पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवली असली तरी अद्याप जोरदार पावसाची सुरुवात झालेली नाही. पावसाअभावी विहिरी, तलाव व जलसाठ्यांमध्ये अपेक्षित वाढ झालेली नसल्याने पाणीटंचाईची चिंता देखील कायम आहे.
शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक आता दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असून "पावसाचे सावट आहे, पण पाऊस नाही" अशीच परिस्थिती सध्या परिसरात पाहायला मिळत आहे.
Tags
धाराशिव जिल्हा